मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये पीक विमा भरायला 1 जुलै पासून सुरवात झाली आहे . प्रधानमंत्री पीक विमा योजना "बीड पॅटर्न " या योजनेला शेतकरी सुद्धा चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत . पीक भरायचा असल्यास लवकरात लवकर भरून घ्या . अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 जुलै 2022 ही ठेवण्यात आली आहे .
"प्रधानमंत्री पीक विमा योजना " यामध्ये पिकाची नुकसान झाल्यास शेतकऱ्याला पीक विमा हा दिल जातो . नेसर्गिक आपत्ति , पुर , वादळ अति पाऊस यामुळे जर पिकांची नुकसान झाली तर विमा हा दिला जातो . तर पिकाची नुकसान झाल्यास विमा कंपनी ला सूचना देणे आवश्यक आहे . तर सूचना कशी दद्यायची किंवा पीक नुकसान झाल्याची तक्रार कशी नोंदवायची याची संपूर्ण माहिती आपण येथे समजून घेणार आहोत .
नुकसान झाल्याची तक्रार नोंदणी करण्याच्या पद्धती
- विमा कंपनी ला फोन करून कळवणे .
- लेखी अर्ज / जीमेल करून कळवणे .
- क्रॉप इन्शुरेंस अप्प वरुण तक्रार नोंदणी करणे .
मित्रांनो वरील पैकी कोणत्याही एका पद्धतीने तुम्हाला पीक नुकसान झाल्याची तक्रार ही नोंदवायची आहे . त्याची माहिती तुम्हाला खाली दिली आहे .
फोन करून कसे कळवावे ?
तुम्ही भरलेल्या विमा अर्जावर कंपनी चा मोबाईल नंबर आहे . त्यावर फोन नंबर वर तुम्हाला फोन करायचा आहे . व ते जे विचारतील ती सगळी माहिती तुम्ही सांगायची आहे . ही माहिती तुम्हाला 72 तासांच्या आत द्यायची आहे .
लेखी अर्ज करून कसे कळवावे ?
मित्रांनो लेखी अर्ज साठी तुम्हाला जवळच्या विमा कंपनी ऑफिस ला जायचे आहे . तेथे तुम्हाला लेखी अर्ज हा करता येणार आहे .
Crop insurance या अप्प वरुण तक्रार कशी नोंदवाल ?
सगळ्यात आधी तुम्हाला हे अप्प डाउनलोड करायचे आहे . त्यानंतर तुम्हाला या अप्प वरुण तुमची माहिती भरून पिकांचे जागेवर फोटो पडून तक्रार नोंदणी करायची आहे . अधिक माहिती साठी कृषि सहायक यांच्याशी संपर्क साधू शकता .